शेतकरी नवरा नको गं बाई!


शेतकरी नवरा नको गं बाई!
सध्या महाराष्ट्रातील शॆतकरी एका नविण दुष्काळाला तोंड देत आहे.या आधी असा दुष्काळ त्याने या आधी कधी पाहिला हि नाही आणि अनुभवला ही नाही.
शॆतकरी बाबुराव बोलताना सांगत होते,"मया पाहण्यात तरी असा दुष्काळ म्या कधी बघीतला नाय.वला दुष्काळ व कोरडा दुष्काळ म्या बघीतलाय पणं ह्यो भलताचं दुष्काळ आमच्या शॆतकऱ्याच्या पोराच्या नशिबी आलायं"
खरंतरं दुष्काळ आणि शेतकरी हे अाता समानार्थी शब्द वाटतात.पण आता आलेला हा दुष्काळ जरा चमत्कारिक आहे.
अशा दुष्काळाची कल्पना याअाधी कुणीचं केली नव्हती.हा दुष्काळ आहे "उपवर वधुंचा"
समाजातील कोणत्याचं वर्गातील मुलींची उपवधु शेतकरी तरूणांना जोडीदार म्हणून पसंती नाहीए.इतकचं काय तर अगदी शेतकरी कुटुंबातील मुली सुद्धा नाक मुरडताना दिसत आहे.याला कारण ही तसॆचं ठोस आहे.
आज मितीला गावात प्रत्येक समाजामध्ये शेतकरी तरुण लग्नासाठी तयार आहेत.अनेकांनी देव पाण्यात ठॆवलॆतं,तर काहीं नवस बोलत आहेत मात्र मुलींच्या वडिलांनी सप शेल पाठ फिरवली आहॆ.
मुलीकडच्यांनी मुलाला स्थळ देण्याची प्रथा होती मात्र आता शेतकरी उपवधु तरूणांना मुलीला मागणी घालावी लागत आहे.त्यातही आम्हाला काहीचं नको फक्त लग्न लावून द्या असा आर्जव मुलावालॆ करत आहेत.
आपण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले तर अनेक शेतकरी पुत्रांना सक्तीने अविवाहित रहावे लागेल.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळॆ शेतकरी कुटुंबातील मुली अापल्या शेतकरी बापाची परिस्थिती पाहुण आहॆत.अठरा विश्व दारिद्रय,नेहमी दुष्काळाने पिडीत झालेला,नेहमी खिसा रिकामा असणारा,डोक्यावर कर्जाचे अोझॆ वाहणारा शेतकरी नवरा कोणत्याही मुलीला नकोय.
मुली शेतकरी तरुणाचॆ स्थळ बघायला नकार देत आहेत.त्यांच्यामते व्यवसाय करणारा किंवा झाडु मारायची नोकरी असेल म्हणजे पिउन असेल तरी चालेल मात्र शेतकरी नको.
यामुळे शेतकरी उपवधु तरुण हवालदिल झाले आहेत.सोयरिक जमवण्यासाठी वॆगवॆगळ्या शक्कल लढवल्या जात आहॆत.अनेक जण फुकटचं संस्थॆवर काम करत आहेत व आम्हाला चांगला पगार आहे म्हणून सांगतात तर काही दुकान टाकून बसत आहेत.
शॆतकऱ्याला ढोर मेहनत करुन सुद्धा हाती काहीचं लागत नाही त्यामुळे निदान आपल्या पोटच्या गोळ्याला हे दिवस दिसून येवू नयेत म्हणून शेतकरी वडील सुद्धा शेतकरी उपवधु तरुणाला नकार देत आहेत.
त्यामुळे शेतीला व शॆतकऱ्याला या देशात भविष्याचं नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.सरकार नावाच्या व्यवस्थेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.शेतकरी तरुणाचॆ माणसिक संतुलन यामुळे बिघडत आहे.
शॆतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही तर अशाचं नवनवीन समस्या भविष्यात निर्माण होउ शकतात.
आज हजारो विवाह जुळवणाऱ्या संस्था आहेत.वधु-वर सूचक केंद्र आहेत.पेपरवर पानच्या-पान स्थळांची माहिती देणारे असतात.त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटॆगरी असतात ज्यात नोकरी,व्यवसाय असतात मात्र शेतकरी ही कॅटॆगरीचं नसते.
काल-परवा अर्थसंकल्प जाहीर झाला.ज्यामध्ये शॆतकऱ्यांच्या मालाला येत्या काळात चांगले भाव मिळतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.सरकारने २०२२ पर्यंत तरी ही परिस्थिती सुधारावी हिचं अपेक्षा आहे.
नाहीतर यॆत्या काळात अखिल भारतीय मुंजा संघटना तयार होऊन मोर्चे निघु शकतात.जे सरकार अडचणीत आणु शकतात.
----------------------------------
✍🏻संदिप डाकॆ |Blogger
©२०१७

No comments:

Post a Comment