जॆल देता का जॆल...आमचा श्वास गुदमरतोय!


अहो ऐकानं...आपल्या देशातील जॆल(कारागृह) ओव्हरफ्लोव झाली आहेत.तुम्ही म्हणाल,होउद्या! त्यात काय नविण.शेवटी कैदीचं न ते.गुन्हॆगार माणसं ती.कुणाची तरी आब्रु लुटून,कुणाचा मर्डर करुन,कुणाच्या घरी चोरी,डाका  टाकुनचं मधात गेली ना?
हो,असचं काही कारणं असेल.आणी म्हणुनचं त्यांना न्यायासणानॆ शिक्षा सुनावली असणारं.मी सहमत आहे तुमच्या या मताशी.
पण अहो न्यायासणानॆ त्यांना शिक्षा सुनावली ती त्यांना कॆलेल्या गुन्हयाची जाणीव आणि अद्दल घडवण्यासाठी.त्याला पश्चाताप व्हावा यासाठी...व कायदा सुव्यवस्थॆचं राज्य अबाधित राहण्यासाठी.
हो,न्यायदॆवतॆचं पारडं एका बाजुनॆ झुकत नाही.फिर्यादीला न्याय आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीचं पाहिजे.तरचं याला कायद्याचं राज्य म्हणता येईल.
बरं,कैद्यांचं जेवण,राहणं,पिणं,कपडॆ मनोरंजनाची साधणं ही आपल्यापॆक्षा वेगळी खालच्या दर्जाची आहॆत आणी असायलाहीतं पाहिजे.
कारण त्यांना आपल्या सारख्याचं सुख-सुविधा मिळाल्यावर मगं कशाचा पश्चात्ताप आणि कशाची शिक्षा! आधिचं भारतात बेरोजगारी वाढलीयं आणि जॆल मध्ये लक्झरी सुविधा मिळतात हे ऐकून बेरोजगार सर्रास गुन्हॆ करुन जॆल मध्ये जातील.अहो हा विनोद नाही परिस्थितीचं तशी आहे.
असो, कैद्यांना सुख-सुविधा मिळू नयेत इथपर्यंत ठिक आहे हो.पण किमाण मोकळा श्वास तरी घेता यावा...शेवटी माणसचं ना ती.त्यांना ही ऋदय आहॆ आणी त्या ऋदयाला शुद्ध नसुद्या पण जगण्यापुरती तरी हवा मिळावी.
जॆल मध्ये गेल्यावर भलॆ-भलॆ निट होतात ओ...हो कारण शेवटी जॆलचं ना ते.पश्चाताप होतो वं त्यांनाही कॆलॆल्या गुन्ह्याचा.
सर्हाईत गुन्हॆगार सोडून द्या पण ज्यांच्या हातून पहिल्यांदाच गुन्हा  घडला आहे अशांना तरी आपण सुधरण्याची  संधी द्यावी असं मला वाटतं.
काल परवा गृह मंत्रालयाने काही आकडॆ जाहीर केले ते ऐकून जरा धक्काचं बसला.
देशात १४०१ तुरुंग हाउसफुल नाही तर ओव्हरफ्लोव आहेत.१४०१ तुरूंगाची कॅपॅसिटी ३ लाख ६६ हजार ७८१ एवढी आहे.परंतु आज घडीला ४ लाख १९ हजार ६२३ कैदी या जेलमध्ये शिक्षा भॊगत आहे.
जसं शेळ्यामेंढ्यांना कोंडतात अगदी तसचं यांना कोंडलयं ओ!त्यांना श्वास घ्यायला पण त्रास होतोयं.
तुम्ही म्हणालं जाउद्यानं संदिपराव जॆल आणि शहरातं तरी कुठं फरक राहीलायं रस्त्यावर गर्दी,वाहणांचं प्रदूषण,ट्रेनमध्यॆ होेणारी घुसमट,सिमॆंटची जंगल यात कुठं मिळतो मोकळा श्वास!इथही आता कोंडल्यासारख होतयं आणि तुम्ही व्यथा मांडताय कैद्यांची!इथं चांगल्या माणसांनाचं काही चांगलं भेटत नाही तर कैद्यांना कुठून भॆटणारं.
खरं आहे ओ...आपल्याला तरी कुठे मिळतो मोकळा श्वास.पण विषय फक्त मोकळ्या श्वासाचा नाही खंडेराव.ठिक आहे एवढे कैदी कशॆ-बशॆ राहतील त्या कोंदड-दमट वातावरणात पण नवोदित गुन्हेगारांना टाकायचं कुठं हाही प्रश्नचं नाही का?
हो,आता माझ्या लक्षात आलं तुम्हाला नेमकं म्हणायचयं काय.संदिप खरं आहे तुझं.आपली जॆल आताचं फुल आहेत आणी भविष्यात जर काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर खरचं अवघड आहे.
हा...कैद्यांनाही मोकळा श्वास मिळावा व आपली सामाजीक शांतता दॆखिल भविष्यात अबाधित रहावी यासाठी नविण जॆल या सुजाण सरकारने बांधावीत हिचं अपेक्षा खंडेराव!
-----------------""----------------------
✍अॅड.संदीप आर डाकॆ
©२०१९ । Blogger
_________________________

No comments:

Post a Comment